🕒 1 min read
Manoj Jarange । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने ते मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) वर निशाणा साधत असतात. अशातच आताही त्यांनी या दोघांवर निशाणा साधला आहे.
“निवडणूकीपूर्वी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला रात्री 2 वाजता भेटायला आले होते. त्यांचे मला 8 दिवसांपासून फोन येत होते. मी झोपलो होतो त्यांनी आत येऊन मला वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असेही सांगितले होते. लक्ष राहुद्या असं सांगत जाताना माझ्या पाया पडले,” असा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “आरोपींना यंत्रणा सोडणार नाही. टोळी धनंजय मुंडे यांची असून ते या आरोपींना लपवत आहे. या टोळीमुळे एका नेत्याने जिवंतपणी मरण यातना भोगल्या आहेत,” असा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde and Walmik Karad
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरंच धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची निवडणुकीपूर्वी भेट घेऊन त्यांच्या पाया पडले का? असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यावर धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Shreyas Talpade, आलोक नाथ यांना ‘ती’ जाहिरात भोवली, 9 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
- आरोपींची गुन्हेगारी कुंडली पाहून Namdev Shastri झाले थक्क, घेतला मोठा निर्णय
- धनंजय मुंडे यांचा राजीनामा निश्चित? Anjali Damania आज करणार मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










