Share

Ambadas Danve | राज्यात दुष्काळ अन् भाजपला निवडणुकीची चिंता; अंबादास दानवे यांचा भाजपला टोला

🕒 1 min readAmbadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी सर्व पक्षांचे प्रमुख राज्यभर दौरे करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने एक विशेष बैठक आयोजित केली आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. भाजपला … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी सर्व पक्षांचे प्रमुख राज्यभर दौरे करताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने एक विशेष बैठक आयोजित केली आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. भाजपला जनतेशी काही घेणं देणं नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

BJP has nothing to do with people’s issues – Ambadas Danve

प्रसार माध्यमांशी बोलत असताना अंबादास दानवे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी निर्माण झालेला पक्ष आहे. भाजपला जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही.

एकीकडे भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना घर कोंबडा आणि ऑनलाईन म्हणतं असतो. उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांचे प्रश्न माहित आहे की नाही? असं भारतीय जनता पक्ष म्हणत असतो.

परंतु, सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व बैठका पुढे ढकलल्या आहे.

कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण महत्त्वाचं नाही. सध्या शेतकऱ्यांना आणि जनतेला आधार देण्याची गरज आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीची चिंता सतावत आहे.”

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाईल. नगरसारख्या जिल्हय़ात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळाचा वणवा आहे. अशाने शाळा बंद पडतील. लहान उद्योग थांबतील. गावांचे स्थलांतर होईल. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज राज्यकर्त्यांत दिसत नाही.

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांत जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही. एकंदरीत महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहेच. त्यात अकलेचाही दुष्काळ पडल्याने मार्ग निघणे अवघड झाले आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!