Share

पावसाचा जोर वाढणार? मुंबईसह राज्यातील अनेक भागांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert अंतर्गत पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Published On: 

Maharashtra rain alert orange warning for several districts

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज असतानाही, सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे. सातारा, पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता असून, त्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. राजस्थानमधील श्री गंगानगरपासून शाहजहांपूर आणि बांकुरा मार्गे ईशान्य भारतातील मिझोरामपर्यंत पसरलेला कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

याव्यतिरिक्त, कर्नाटकवर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण झाले आहेत. रत्नागिरी, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागांतही पावसाचा अंदाज आहे. मुंबईतही पाऊस पडत आहे. काही भागांत रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि सकाळीही पावसाचा जोर कायम होता.

Maharashtra rain alert orange warning for several districts

सततच्या पावसामुळे पिकांना मोठा फायदा होत आहे. तसेच, धरणे ओसंडून वाहत असून पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या सुमारे ८८.९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणे जवळपास भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचे दिसत आहे.

भंडारा शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगला पाऊस झाला आहे. काल आणि आज झालेल्या पावसामुळे हवामान थंड झाले असून, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने आज भंडारा जिल्ह्यासाठी ‘ग्रीन अलर्ट’ दिला असला, तरी भंडारा शहरासह लाखनी, साकोली, तुमसर आणि मोहाडी तालुक्यांतील काही भागांत पावसाच्या सरी बरसल्या.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तरीही पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता कायम आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून पेरणीच्या कामांना गती आली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेला मोठा आणि अखंड पाऊस या भागात अजून झालेला नाही. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीपातळीत थोडी वाढ झाली असली, तरी एकूण परिस्थिती अजूनही समाधानकारक नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही