🕒 1 min read
वाशिम– राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी आणि शर्तींमुळे सध्या शेतकऱ्यांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे. याच्याच निषेधार्थ वाशिमच्या अडोळी येथे सतीश इडोळे या तरुण शेतकऱ्याने आपली दुचाकी जाळून थेट सरकारला आव्हान दिलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच सरकार कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहे. पण यात अनेक जाचक अटी लादण्यात आल्याने शेतकरी संघटनांनी याला कडाडून विरोध केलाय. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर आता रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सरसकट कर्जमाफीसाठी (Farmer Protest) जोरदार आंदोलन पुकारलंय.
याच आंदोलनाला आणि तुपकरांना पाठिंबा देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला सरसकट न्याय मिळावा आणि सरकारने अटी रद्द कराव्यात, हीच त्यांची एकमुखी मागणी आहे.
शेतकऱ्यांच्या भावना सरकारने वेळीच समजून घ्याव्यात, अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळेल. आज दुचाकी पेटवलीय, पण यापुढे थेट मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा अत्यंत आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या संतापाची कशी दखल घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’मुळे २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना संपणार
- तुकाराम मुंढेंचा दणका: मुंबईत स्तनांचा आकार वाढवणाऱ्या खोट्या उत्पादनांवर धाड, राज्यात कोट्यवधींचा माल जप्त
- एल निनोचा फटका! राज्यात पावसाची आणखी दडी, सरकारकडून पाणीकपातीचे मोठे संकेत













