🕒 1 min read
पुणे – जून महिना अर्धा संपला तरी आकाशात ढगांचा पत्ता नाही, हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर महाराष्ट्रावर दुष्काळाचं मोठं संकट ओढवेल का? सध्या तरी हवामानाचं चित्र फारसं आशादायक दिसत नाहीये.
साधारण १५ जूनपर्यंत राज्याला व्यापून टाकणारा मान्सून (Monsoon) अजूनही अरबी समुद्रातच अडकून पडला आहे. अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे त्याच्या वाटचालीत मोठा अडथळा निर्माण झाला असून, २० जूनपर्यंतही तो राज्यात दाखल होण्याची शक्यता आता बरीच धूसर झाली आहे.
मान्सून अपडेट: एल निनोच्या प्रभावाने वाढवली चिंता
प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, या एल निनोचा थेट फटका महाराष्ट्रातील पावसावर पडू शकतो. त्यामुळेच मान्सून सध्या जिथे आहे, तिथेच थांबल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत. पेरणीची सगळी तयारी झाली असली, तरी जोरदार पाऊस झाल्याशिवाय बियाणं मातीत न टाकण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जून महिना असाच कोरडा गेला तर पिण्याच्या पाण्याचा आणि दुबार पेरणीचा मोठा प्रश्न उभा राहील.
सध्या देशातील काही राज्यांत मान्सून सक्रिय झाला असला तरी महाराष्ट्राला अद्याप प्रतीक्षाच आहे. काही हवामान अभ्यासकांच्या मते, २२ जूनच्या आसपास राज्यात पावसाला सुरुवात होऊ शकते. पण तोपर्यंत बळीराजाचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; पंढरपुरात नेमकं काय घडलं?
- प्रसाद वेदपाठकची मनसेकडे धाव; घाटकोपरच्या ‘त्या’ पांढऱ्या पट्टीवरून वाद चिघळला, मनसे आक्रमक होणार?
- वैभव सूर्यवंशी भडकला: मैदानावर श्रीलंकन खेळाडूंशी राडा, पण ड्रेसिंग रुममध्ये नेमकं कोणाच्या पाया पडला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












