🕒 1 min read
जेजुरीच्या खंडोबा गडावर उधळला जाणारा पवित्र ‘भंडारा’ (Bhandara Issue) खरोखरच शुद्ध आहे की त्यात विषारी रसायनांचा खेळ सुरू आहे? नुकतीच भंडाऱ्याला अचानक आग लागल्याची एक धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी थेट अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची भेट घेतली आहे. ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ अशी अधिकृत घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली असून मुंढेंनीही यावर मोठं आश्वासन दिलं आहे.
Bhandara Issue In Maharashtra
सध्या कायद्यात ‘भंडारा’ म्हणजे नेमकं काय, याची कोणतीही ठोस व्याख्या नाही. याच तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत देवस्थानांच्या बाहेर रासायनिक आणि ज्वलनशील रसायने मिसळलेला बनावट भंडारा सर्रास विकला जात आहे.
जेजुरी गडावर भंडाऱ्याला लागलेली आग याच भेसळीचा परिणाम असल्याचा संशय आहे. हाच केमिकलयुक्त भंडारा उधळताना भाविकांच्या श्वासावाटे शरीरात जात असल्याने आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे, असा मोठा गौप्यस्फोट पाचपुते यांनी केलाय.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पाचपुते म्हणाले, “पूर्वीपासून भंडारा म्हणून केवळ शुद्ध हळदच विकली जायची. पण आता मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याने भाविकांच्या श्रद्धेशी खेळ सुरू आहे.” त्यामुळेच कायद्यात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुसरीकडे, तुकाराम मुंढे यांनी या विषयावर अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ‘भंडारा म्हणजेच हळद’ असं स्पष्ट करणारं अधिकृत परिपत्रक एफडीएकडून काढलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “हे अत्यंत लज्जास्पद आहे”, शिल्पा शिंदेवर भडकली हिना खान, टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ
- श्रेयस अय्यर होणार नवा कर्णधार? टीम इंडियात मोठा भूकंप, सूर्याची सुट्टी होणार?
- मान्सूनची केरळमध्ये दमदार एन्ट्री! पण महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान विभागाची सर्वात मोठी अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












