🕒 1 min read
मुंबई : चलनातून बाद करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. दोन वर्षांपूर्वी सुरु झालेली ही ‘क्लीन नोट पॉलिसी’ आता आपल्या अंतिम आणि यशस्वी टप्प्यात पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ९८.४१ टक्के दोन हजारांच्या नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. त्यामुळे बाजारातील या नोटांचा ओघ आता जवळपास थांबल्याचे चित्र आहे.
१९ मे २०२३ रोजी आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी बाजारात तब्बल ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा फिरत होत्या. मात्र, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी पाहता, आता जनतेकडे केवळ ५,६६९ कोटी रुपयांच्याच नोटा शिल्लक राहिल्या आहेत. नोटाबंदीनंतर बाजारातील रोकड टंचाई भरून काढण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये या नोटा तातडीने आणल्या होत्या.
98.41% of Rs 2000 notes returned to banks, says RBI
अजूनही नोटा शिल्लक असल्यास काय करावे?
बऱ्याच नागरिकांच्या मनात संभ्रम आहे की या नोटा आता रद्दी झाल्या आहेत का? तर नाही. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, दोन हजारांची नोट आजही ‘लीगल टेंडर’ (कायदेशीर चलन) म्हणून कायम आहे. जर तुमच्याकडे किंवा घरात अद्याप या नोटा पडलेल्या असतील, तर घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही त्या पोस्ट ऑफिसमधून ‘इंडिया पोस्ट’च्या माध्यमातून आरबीआयच्या इश्यू ऑफिसला जमा करण्यासाठी पाठवू शकता. तसेच आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये जाऊनही या नोटा थेट बँक खात्यात जमा करण्याची सुविधा सुरू आहे.
बँकिंग प्रणालीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड परत आल्याने अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, प्राप्तीकर विभागाच्या धाडींमध्ये जप्त होणाऱ्या रकमेत या मोठ्या नोटांचे प्रमाण ४३ टक्क्यांहून अधिक होते, ज्याला आता मोठा आळा बसला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संभाजीनगरात राडा! “गाढवावरून धिंड काढू”; अंबादास दानवे अधिकाऱ्यांवर का भडकले? पाहा व्हिडिओ
- ग्राहकाने दाखवला इंगा! १० रुपयांच्या ‘सर्व्हिस चार्ज’पायी हॉटेलला भरावा लागला ५० हजारांचा दंड
- निवडणूक अर्ज छाननीवरून राडा; “सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय, आणि आम्हाला…”, मनसेचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












