Share

गिरीश महाजनांवर Sanjay Raut यांचा हल्लाबोल; कानातील बोळे काढून ऐकावं..!

Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut launched attack on BJP leader Girish Mahajan over the demand for a national holiday on Shiv Jayanti. Raut alleged that Mahajan is “mentally disturbed” and entangled in several legal issues, suggesting he was not aware that Uddhav Thackeray had called for a nationwide holiday on the occasion of Shiv Jayanti.

“Maharashtra already observes the holiday, but the demand is to declare it across the country. Mahajan should listen properly—remove the cotton from his ears,” Raut said mockingly.

Raut also criticized Union Home Minister Amit Shah’s recent speech at Raigad, claiming that many statements were historically inaccurate and that Shah referred to Shivaji Maharaj disrespectfully. He added, “If you truly respect Shivaji Maharaj, declare a national holiday on his birth anniversary.”

Sanjay Raut Criticized State government due to increase in cylinder price

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत शिवजयंती सुट्टीच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केले. “गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य ढासळलेलं दिसतं. ते अनेक खटल्यांत अडकले आहेत, त्यामुळे त्यांना नीट ऐकूही येत नाही,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशात शिवजयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. “महाराष्ट्रात आधीपासूनच सुट्टी आहे, पण देशभर असावी यासाठी ही मागणी आहे. महाजन यांनी ऐकावं, कानातील बोळे काढून ऐकावं,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Sanjay Raut Slams Girish Mahajan 

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवाजी महाराजांवर प्रवचन दिलं, पण त्यात अनेक गोष्टी चुकीच्या होत्या. शिवरायांचा उल्लेख एकेरी केला गेला. औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणाऱ्यांनी जर शिवरायांवर खरं प्रेम असेल, तर त्यांनी देशभर शिवजयंतीला सुट्टी जाहीर करावी,” असं ते म्हणाले.

मालवणमधील पुतळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप

मालवण समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे स्वागत करत असतानाही राऊतांनी जुन्या प्रकरणांवर सरकारला घेरले. “पहिला पुतळा का पडला, त्याचे दोषी अद्याप बाहेरच आहेत. त्या प्रकल्पात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला, तो पैसा निवडणुकीसाठी वापरला गेला. स्थानिक नेत्यांच्या घरांपर्यंत तो पैसा गेला. त्या गद्दारांवर कारवाई का झाली नाही?”

“न्याय देवतेनं डोळे उघडू नयेत”

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, राऊत म्हणाले, “न्यायदेवतेने डोळ्यांवरील पट्टी काढली असली तरी ती आंधळीच असली पाहिजे. न्याय करताना कोण समोर आहे हे न पाहता निष्पक्षपणे निर्णय व्हायला हवेत.”

“भूषण गवई यांचा कार्यकाळ जरी साडेसहा महिन्यांचा असला तरी देशाच्या न्यायव्यवस्थेत मोठं परिवर्तन घडवू शकतात. ते महाराष्ट्र आणि विदर्भाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे शोषित आणि लोकशाहीप्रेमी समाजासाठी त्यांच्याकडून विशेष अपेक्षा आहेत.”

महत्वाच्या बातम्या

Youtube

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now