🕒 1 min read
Prakash Ambedkar । महाराष्ट्रात दोन आमदारांच्या गाड्या फोडल्याच्या घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची गाडी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी फोडली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली होती.
या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली होती. नाराज संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असं वक्तव्य केलं होतं. त्यांची ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संतापात अमोल मिटकरी यांची अकोल्यात गाडीची तोडफोड केली होती.
यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तव्य केले आहे. ते म्हणाले,” चिल्लर लोकांच्या गाड्या फोडण्यापेक्षा शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
काय म्हणाले Prakash Ambedkar?
“आता मिटकरी कुठल्या पक्षात आहेत? अजित पवार गटात आहे. जितेंद्र आव्हाड कोणत्या गटात आहेत? शरद पवार गटात आहेत. गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे, अरे चिल्लर लोकांच्या का गाड्या फोडत आहात? या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झालं तरी मागं हटत नाही’ – अजित पवार
- ७० हजार कोटींचा झोलर अजित पवारांना कटोरा घेऊन फिरावं लागेल – मनसे
- शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












