Share

प्राजक्त तनपुरेंना थेट उमेदवारी, भाजपची यादी जाहीर अन् राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पक्षप्रवेश करताच प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून तिकीट दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

Kripashankar Singh U-Turn: Says Mumbai Mayor Must Be Marathi Hindu

🕒 1 min read

मुंबई – कालपर्यंत शरद पवारांच्या गोटात असणाऱ्या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश करताच अवघ्या काही तासांत विधानपरिषदेची उमेदवारी कशी मिळते? हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने अखेर ११ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपने सर्वाधिक जागा पदरात पाडून घेत विरोधकांना एकप्रकारे धक्कादायक माहिती दिली आहे.

Maharashtra BJP MLC Candidates List Announced 

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून भाजपमध्ये आलेले प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून मिळालेली उमेदवारी सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली आहे.

राहुरीचे माजी आमदार आणि जयंत पाटील यांचे भाचे असलेल्या तनपुरेंनी ३० मे रोजी मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला. शेतकरी आणि पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपमध्ये जात असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे… सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि भाजपचे सह-कोषाध्यक्ष अरुण लखाणी यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून तिकीट मिळालं आहे. अमरावतीमधून प्रवीण पोटे पाटील, तर भंडारा-गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नेत्यांनाही मोठी संधी मिळाली आहे. सांगली-साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत तर नांदेडमधून अमर राजूरकर रिंगणात असतील. छ. संभाजीनगर-जालना जागेसाठी सुहास शिरसाट आणि धाराशिव-बीड-लातूरमधून बसवराज पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे.

तसेच जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ. राजीव पोतदार हे भाजपचे उमेदवार असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार… महायुतीच्या १७ जागांपैकी भाजपने ११, शिंदे गटाने ४ तर अजित पवार गटाने २ जागांवर लढण्याचे निश्चित केले आहे.

निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असून १८ जूनला प्रत्यक्ष मतदान पार पडेल. तर २२ जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळेच… आता मविआचे नेते सत्ताधाऱ्यांच्या या रणनीतीवर कसा हल्लाबोल करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!