Share

Atif Aslam India Ban: ‘मी भारताला मिस करत नाही!’, १० वर्षांच्या बंदीनंतर आतिफ असलमचा मोठा गौप्यस्फोट

पाकिस्तानी गायक आतिफ असलमने भारतात त्याच्यावर लागलेल्या बंदीवर मोठा खुलासा करत, व्हीपीएनद्वारे चाहते गाणी ऐकत असल्याचा दावा केलाय.

Published On: 

Atif Aslam performing live on stage in concert

Atif Aslam India Ban: ‘तेरा होने लगा हूँ’, ‘तू जाने ना’, ‘पहिली नजर में’ आणि ‘दिल दिया गल्लां’… ही सुपरहिट गाणी ऐकली की आजही एकच नाव ओठांवर येतं. ते म्हणजे आतिफ असलम! एकेकाळी बॉलिवूडच्या रोमँटिक गाण्यांवर एकाधिकारशाही गाजवणारा हा पाकिस्तानी आवाज अचानक भारतातून गायब झाला. विचार करा, गेली जवळपास १० वर्षे आतिफने भारतात एकही गाणं गायलेलं नाही किंवा कोणताच शो केलेला नाही. पण आता एवढ्या वर्षांच्या दीर्घ शांततेनंतर त्याने एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आतिफने भारतात आपल्यावर लागलेल्या बंदीबद्दल भाष्य केलंय. “मी भारतातील माझ्या लाखो चाहत्यांना खूप मिस करतो. पण, तिथे काम न करण्याची मला आता अजिबात खंत नाही,” असं तो स्पष्टच म्हणाला. विशेष म्हणजे, ज्यांनी त्याच्यावर बंदी घातली, त्यांचे त्याने चक्क आभार मानलेत. कारण याच बंदीमुळे त्याला प्लेबॅक सिंगिंगच्या बाहेर पडून स्वतःचं स्वतंत्र संगीत तयार करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

Atif Aslam India Ban: आतिफ असलमवर नेमकी बंदी का?

या सगळ्याची सुरुवात २०१६ मध्ये झाली. उरीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध प्रचंड ताणले गेले. देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळेच… सर्व पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले. याचा सर्वात मोठा फटका आतिफ असलमला बसला. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्याचे गुरुग्राम आणि लखनौ येथे मोठे शोज होणार होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हे सर्व शोज तातडीने रद्द केले.

दुसरीकडे… २०१९ मध्ये परिस्थिती अधिकच चिघळली. पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या घटनेनंतर ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने (AICWA) पाकिस्तानी कलाकारांवर भारतात संपूर्ण बंदी घातली. भारत सरकारनेही ओटीटी आणि म्युझिक प्लॅटफॉर्म्सना पाकिस्तानी कन्टेन्ट हटवण्याचे थेट आदेश दिले. दोन्ही देशांमधलं राजकारण तापलं आणि याच दबावामुळे टी-सिरीजसारख्या कंपन्यांनीही त्याची गाणी काढून टाकली.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतिफने २०१५ मध्ये भारतातील इंदूर शहरात शेवटचा परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतर त्याला भारतात कधीच येता आलं नाही. पण आजही भारतातील त्याचे अनेक चाहते व्हीपीएन (VPN) वापरून त्याची नवी गाणी ऐकतात, असा दावा त्याने स्वतः केलाय. थोडक्यात सांगायचं तर, दोन देशांमधील तणावामुळे एका गायकाचा भारतातील प्रवास कायमचा संपुष्टात आला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही