🕒 1 min read
Santosh Deshmukh । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे अपहरण करून अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या हत्याप्रकरणावरून विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना टार्गेट करून त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. “खंडणीची मागणी मे महिन्यापासून होती. यावेळी एका अधिकाऱ्याचे अपहरण केले होते. जर ही कारवाई झाली असती, तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता,” असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
Anjali Damania on Santosh Deshmukh Murder
पुढे त्या म्हणाल्या की, “या सगळ्या गोष्टी एकच असून विष्णू चाटे आणि जे जे माणसं होती त्यांनी फक्त आणि फक्त वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या सांगण्यावरून काम केलं होतं.” दरम्यान, आता अंजली दमानिया यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- IPL 2025 । ‘हे’ खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतात चॅम्पियन, जाणून घ्या सविस्तर..
- Amazon Sale । बंपर धमाका! ‘या’ स्मार्टफोनवर होईल हजारोंची बचत, पहा ऑफर
- Premium Rate Service Scam । मार्केटमध्ये आलाय नवीन स्कॅम, फक्त एक कॉल अन् जिओ ग्राहकांचं बँक खातं होतंय साफ!













