छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगरावर मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही जीव गेल्याची बातमी (Khavdya Mountain Case) ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला होता. पण आता यात एक असा ट्विस्ट आलाय, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
२१ ऑगस्टला कुणाल चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता या तिघांचा डोंगरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला याला आत्महत्या आणि अपघाताचं रूप दिलं होतं. पण आता कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी यावर एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुणाल तिथे जीव द्यायला गेलाच नव्हता.
खवड्या डोंगर मृत्यू प्रकरण आणि मावशीचा खळबळजनक दावा
हा सगळा प्रकार एका तुटलेल्या कुटुंबाला जोडण्याच्या प्रयत्नातून घडला आहे. कुणालचे वडील काही कारणांमुळे घर सोडून गेले होते. आई आणि वडिलांमध्ये प्रचंड दुरावा होता. त्यामुळे कुणाल आतून पूर्णपणे खचला होता. आई-वडिलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी आणि वडिलांना भावनिक करण्यासाठीच तो खवड्या डोंगरावर गेला होता, असं मावशीने म्हटलंय.
घरात पैशांची किंवा महागड्या मोबाईलची कोणतीही अडचण नव्हती. दाजींकडे शेती होती आणि ते चांगल्या घरचे होते, असं कल्याणी यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, सासरच्या लोकांविषयी मनातली खदखद मांडण्यासाठीच संगीता यांनी यूट्यूबचा आधार घेतला होता. कारण पतीसोबत त्यांचा कसलाच संवाद उरला नव्हता. कुणालने काही दिवसांपूर्वीच वडिलांना फोन करून ‘मला सोडून जाऊ नका’ अशी विनवणी केली होती.
२०२५ मध्येही कुणाल असाच रागाच्या भरात या डोंगरावर गेला होता. पण तेव्हा तो फक्त फिरायला गेला होता, जीव द्यायला नाही. यावेळीही त्याला फक्त आई-वडिलांना एकत्र आणायचं होतं. पण दुर्दैवाने त्याचा तोल गेला आणि या भावनिक प्रयत्नात संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला. आता या नव्या दाव्यानंतर पोलीस तपासाला कोणती दिशा मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रेमापोटी चक्क MPSC चा पेपर फोडला! ‘लव्हस्टोरी’मुळे औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द
- गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा दे धक्का! बाजूला सारत काढली स्वतःचीच नवी एसटी कामगार संघटना
- MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी












