Share

LIVE भाषणात अमित ठाकरे अचानक ब्लँक; ‘मी विसरायला लागलो…’ म्हणत स्टेजवरून निघून गेले

मनसे विद्यार्थी सेनेच्या मुंबई मेळाव्यात ‘मी विसरायला लागलो’ म्हणत अमित ठाकरे काही क्षण ब्लँक झाले आणि स्टेजवरून बाहेर गेले.

Published On: 

Amit Thackeray blank during a live speech

मुंबई : मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला अमित ठाकरे (Amit Thackeray) मार्गदर्शन करत होते. पण मार्गदर्शनदरम्यान करता करता अमित ठाकरे भाषणच (Live Speech) विसरले. देशातील आणि राज्यातील परिस्थितीबद्दल बोलत असताना ते भावूक झाले. क्षणभर त्यांना काय बोलावे हे सुचेनासे झाले आणि ते नि:शब्द झाले. “मी माझे भाषण विसरलो आहे,” असे कबूल करून ते मंचावरून खाली उतरले, ज्यामुळे मनसे कार्यकर्ते अवाक झाले. मात्र, सुमारे दहा मिनिटांनंतर ते पुन्हा मंचावर आले आणि त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आक्रमक भाषण केले.

मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. अमित ठाकरे उपस्थितांना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. मंचावर पाऊल ठेवताच जोरदार घोषणाबाजी झाली. त्यांनी आपले जॅकेट काढले, “लव्ह यू टू” असे म्हणत स्मितहास्य केले आणि सर्वांना नमस्कार केला. त्यांनी उपस्थितांना गमतीने काही घोषणा देण्यास सांगितले जेणेकरून ते आपले भाषण लवकर आटोपू शकतील. ही विनंती करताच मनसे कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर अमित ठाकरे म्हणाले, “अरे, मी तर फक्त गंमत करत होतो,” आणि त्यांनी प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात केली.

मी राज साहेबांचा मुलगा नसतो तर…

“आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, ज्या तरुण-तरुणींनी आंदोलन केले आणि केंद्र सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी कृपया जोरदार टाळ्या वाजवा. मी हे मनापासून सांगतो. मी राज साहेबांचा मुलगा आहे म्हणूनच राजकारणात आहे. जर मी राज साहेबांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात नसतो. मी हे मुद्दाम सांगतोय केवळ ते माझे वडील आहेत किंवा ते राजकारणात आहेत म्हणून नाही, तर ते एक प्रामाणिक माणूस आहेत म्हणून. मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, तुमच्यासारखे सहकारी नसतील तर मी राजकारणात टिकू शकलो नसतो,” असे अमित ठाकरे म्हणाले.

Amit Thackeray blank during a live speech

“मी हे मनापासून सांगतो. आपण आंदोलने केले आणि मला पक्षात पद मिळाले. त्यानंतर मी महाराष्ट्रभर दौरा केला. मी अनेक तरुण-तरुणींना भेटलो. तुम्ही तुमची संघटना (युनिट) स्थापन करण्याचा कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या राबवला. त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. तुमच्याशिवाय मी काय केले असते, हे मला माहित नाही,” असे ते नम्रपणे म्हणाले.

“आपल्याला जुन्या आंदोलनांना मागे सारले पाहिजे. ती तुम्हाला आठवत असतील, पण मला वाटतं आपण ती विसरली पाहिजेत. आपण यश मिळेपर्यंत आंदोलन केलं. थांबलो नाही. आपण ही आंदोलने विसरलं पाहिजे. पुढे गेलं पाहिजे. देशाची, राज्याची परिस्थिती काय झाली हे पाहिलं पाहिजे. आता विसरलं पाहिजे. मला विसरायला होतंय… खरंच… मला विसरायला होतंय. काय बोलायचं तेच आठवत नाहीये. मी येतो परत थांबा, असं म्हणत अमित ठाकरे यांनी स्टेज सोडला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही