Share

‘अपयश चालेल, अप्रामाणिकपणा नाही’; NEET आंदोलनावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी व्यवस्था उभी राहावी, असे आवाहन केले.

Published On: 

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. तरुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित व महत्त्वाचे असल्याची खात्री देणे ही समाजाची मोठी जबाबदारी आहे, यावर त्यांनी भर दिला.

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या बॅनरखाली आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेली ही आंदोलने (Student Protest) अलीकडे हिंसक वळणावर आली आहेत. या परिस्थितीत, तेंडुलकर यांनी पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित व्यवस्थेची गरज अधोरेखित केली. तसेच, आपल्या कष्टाचे योग्य फळ मिळाले नाही, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात कधीही निर्माण होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.

सचिन तेंडुलकर यांनी ‘एक्स’ (X) सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “माझे वडील प्राध्यापक होते. त्यांनी अनेक तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मला लहानपणापासून एक महत्त्वाचा धडा शिकवला होता, ‘अपयश आले तरी चालेल, पण फसवणूक कधीही करू नको. शॉर्टकटचा मार्ग कधीही स्वीकारू नको. समाजातील प्रौढ व्यक्ती म्हणून योग्य मूल्ये आणि संस्कृती घडवण्याची जबाबदारी आपली आहे. जो समाज मेहनतीपेक्षा फक्त निकालाला महत्त्व देतो, तो गुणवत्तेपेक्षा शॉर्टकटला प्रोत्साहन देतो.”

पुढे सचिन तेंडुलकर म्हणाले की, “आज विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळाले नाही, अशी भावना वाटत असेल, तर त्यांची निराशा समजण्यासारखी आहे. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. भारतातील तरुणाई स्वप्नांनी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे. हीच ऊर्जा देशाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासकीय यंत्रणा अशा समाजातील प्रत्येक घटकावर आपल्या तरुणांना सतत प्रोत्साहन देण्याची आणि त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे.”

“आपण अशी संस्कृती निर्माण केली पाहिजे, जिथे कठोर परिश्रमाला योग्य सन्मान मिळेल, प्रामाणिकपणाला प्रोत्साहन दिले जाईल आणि गुणवत्तेलाच यशाचे खरे मापदंड मानले जाईल. मला पूर्ण विश्वास आहे की, आपण सर्व मिळून असे उपाय शोधू, ज्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या स्वप्नांचे संरक्षण होईल.” असा विश्वास सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, २० जूनपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली विद्यार्थी जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. नीट (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमिततांची दखल घेणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पेपरफुटीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे यांसारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही