🕒 1 min read
सोलापूर: लग्नानंतर फक्त दोन महिन्यात घरात असा काय प्रकार घडला असेल ज्यामुळे एका २६ वर्षीय तरुणाला स्वतःचं आयुष्य संपवावंसं वाटलं? सोलापूर जिल्ह्यात (Solapur Crime) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सध्या अनेकांना सुन्न करून सोडलं आहे.
मोहोळ तालुक्यातील यावली गावात संजय राजाराम राऊत या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे.
सोलापूर क्राईम न्यूज: प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणाचा अंत
संजयचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पण लग्नानंतर पत्नीचे आधीपासूनच दुसऱ्या एका तरुणावर प्रेम असल्याचे त्याला समजले. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले.
दुसरीकडे पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे यांनी मिळून संजयला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सततच्या त्रासामुळे आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने संजय आतून पूर्णपणे खचला होता.
अखेर शुक्रवारी, १० जुलै रोजी त्याने आपल्या राहत्या घरात गळफास लावून स्वतःला संपवले. संजयच्या अचानक जाण्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर संजयचे वडील राजाराम राऊत यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोहोळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- वैभव सूर्यवंशीवरून निवडकर्त्यांना सुनावलं! टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
- स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!
- भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












