Share

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची 3 तास बंद दाराआड बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

दिल्लीत अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तीन तास बैठक पार पडली. राज्यातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती.

Published On: 

Shah-Fadnavis

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या दौऱ्यात नर्मदा प्रकल्पासंदर्भातील (Narmada Project) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राला नर्मदा नदीचे पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. (Delhi Meeting)

नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीनंतर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्वतंत्रपणे बंद दाराआड बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 ते 10 या वेळेत ही बैठक पार पडली. जवळपास तीन तास चाललेल्या या चर्चेत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार, आगामी राजकीय रणनीती आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापनेसंदर्भात पत्रही सादर केल्याचे वृत्त आहे. यानंतर ठाकरे गटातील आणखी काही लोकप्रतिनिधी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) मध्ये दाखल झालेल्या खासदारांपैकी दोघांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. या संभाव्य घडामोडींवरही अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्य मंत्रिमंडळात तत्काळ मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात असले, तरी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल (Cabinet Expansion)  होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फेरबदलात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, तर काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, अशी राजकीय चर्चा आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

याशिवाय, दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आल्याने आगामी काळात महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील या बैठकीकडे राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही