केरळचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी गुरुवारी भाजपविरुद्ध राजकीय लढा देणाऱ्या विरोधी पक्षांना एक महत्त्वाचे आवाहन केले.
त्यांनी विरोधी पक्षांना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आपला संयुक्त नेता म्हणून पुढे आणण्याचे आवाहन केले. राहुल यांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला तरच विरोधी आघाडी २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकू शकेल, असा अंदाज चेन्नीथला यांनी वर्तवला.
केरळचे गृहमंत्री होण्यापूर्वी, चेन्नीथला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेत सक्रिय होते. ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांना विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याचा अप्रत्यक्ष प्रस्ताव मांडला.
Ramesh Chennithala on Rahul Gandhi
राहुल गांधी यांचे वर्णन देशातील जनतेशी थेट नाते जोडणारे दूरदर्शी नेते असे करत चेन्नीथला यांनी ‘भारत जोडो यात्रे’चा उल्लेख केला. या पदयात्रांच्या माध्यमातून राहुल यांनी लाखो नागरिकांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे, असे नमूद करत त्यांच्या नेतृत्वामुळे देशाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बुधवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली. त्या बैठकीचा फोकस प्रामुख्याने केंद्र सरकारविरोधातील जनतेच्या वाढत्या रोषावर होता. केंद्र सरकार लोकांमध्ये अलोकप्रिय होत चालले आहे. देशातील तरुण विविध मार्गांनी सरकारबद्दल आपली नाराजी व्यक्त करत आहेत आणि सरकारच्या धोरणांबाबतची असंतोष स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजपच्या राजवटीत तरुणांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे, असा दावा चेन्नीथला यांनी केला.
भविष्यात केरळमध्ये भाजप डाव्या पक्षांची जागा घेऊन मुख्य प्रतिस्पर्धी बनेल का?, असे विचारले असता चेन्नीथला यांनी ही शक्यता फेटाळून लावली. केरळ हे एक धर्मनिरपेक्ष राज्य असून तेथील जनता भाजपला कधीही स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना चिन्ह गोठवलं तर आमदार-खासदार भाजपकडे जातील? प्रकाश आंबेडकरांचा इशारा
- अट्टल चोरट्यांना अभय, विधीसंघर्षग्रस्त बालकांवर कारवाई? लामगव्हाण घरफोडीत नवा ट्विस्ट; पोलिसांच्या भूमिकेवर फिर्यादीचा संशय
- “राणेंचं नाव सुचवलं म्हणून मंत्रिपद जाणार!” दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











