मुंबई : राज्य सरकारने मीरा-भाईंदरला वसई-विरारशी जोडणाऱ्या मेट्रो-१३ (Metro 13) मार्गिकेला (कॉरिडॉर) मंजुरी दिली आहे. २५.०३ किमी लांबीच्या या मार्गासाठी १७,७२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून जाणारी ही मेट्रो-१३ मार्गिका मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांचा प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी करेल.
या मार्गिकेतील २१.७८ किमीचा मार्ग एलिवेटेड (elevated) असेल आणि ३.२५ किमीचा मार्ग भुयारातून जाणार, एमएमआरडीए (MMRDA) २०३१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करत आहे.
याव्यतिरिक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सोरतापवाडी आणि वरवे-शिवरे दरम्यानच्या रिंग रोडच्या टप्प्याला मंजुरी जाहीर केली, ज्यासाठी १०,५०२.३६ कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.
Mira Bhayandar Vasai Virar Metro 13
पुण्यातील सोरतापवाडी आणि वरवे-शिवरे दरम्यानचा रिंग रोडचा हा टप्पा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल. या प्रकल्पाचा सुधारित खर्च १०,५०२.३६ कोटी रुपये इतका आहे. हा पूर्व-विस्तार (eastern extension) पूर्व भागातील वाहतूक सुरळीत करेल आणि या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे केली जाईल.
या प्रकल्पात सोरतापवाडी ( वळाटी ) ते पुणे-सोलापूर ते वारवे ( बुद्रुक ) शिवरे या पुणे-सातारा रोडपर्यंत ३१.८०५ किमीचा एक्सेस कंट्रोल एक्स्प्रेसवे बांधण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हा नवीन आणि क्रांतिकारी प्रकल्प अधिक वेगवान, उत्तम संपर्क व्यवस्था असलेला आणि भविष्यासाठी सज्ज असा महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक निर्णायक पाऊल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे नमूद केले की, या उपक्रमामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहरी जीवनमानाचा दर्जा सुधारेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- नसरापूरनंतर जुन्नर हादरलं; 10 वर्षीय मुलीची हत्या, संशयित आरोपी ताब्यात
- DA Hike Maharashtra: सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 60% झाला; ऑगस्टच्या पगारासोबत थकबाकी
- “कपिल सिबलांचे आरोप बिनबुडाचे”; शिवसेना प्रकरणावर नार्वेकरांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











