🕒 1 min read
मुंबई – एकामागून एक धक्के पचवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना आता खरोखरच शेवटच्या घटका मोजत आहे का? सध्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु असून, याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे संजय निरुपम यांनी एक मोठा दावा केला आहे.
शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. २०२९ पर्यंत उबाठा (UBT) पक्ष पूर्णपणे संपेल, असा दावा निरुपम यांनी एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. त्यामुळेच आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
‘ऑपरेशन टायगर’ अन् ठाकरे सेनेला गळती?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे ९ पैकी तब्बल ७ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. या संभाव्य राजकीय भूकंपालाच ‘Operation Tiger’ म्हटलं जातंय. यावर बोलताना निरुपम म्हणाले की, उबाठा पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यांचे लोक दररोज पक्ष सोडत आहेत. लोक हळूहळू त्यांची साथ पूर्णपणे सोडतील आणि हा पक्ष संपेल.
दुसरीकडे, मंत्री आशिष जैसवाल यांनी यावर थेट बोलणे टाळले. पण त्यांनी दिलेले संकेत बरेच काही सांगून जातात. जोवर खासदार अधिकृत प्रवेश करत नाहीत, तोवर बोलणं योग्य नाही, असं ते म्हणाले. जर कुणाला वाटत असेल की एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा खरा वारसा चालवत आहेत, तर ते स्वतःच्या मतदारसंघासाठी आणि राजकीय भविष्यासाठी नक्कीच निर्णय घेऊ शकतात, असं सूचक विधान जैसवाल यांनी केलं. आता खरोखरच हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का आणि आकड्यांचं गणित कसं जुळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंचा दणका: मुंबईत स्तनांचा आकार वाढवणाऱ्या खोट्या उत्पादनांवर धाड, राज्यात कोट्यवधींचा माल जप्त
- एल निनोचा फटका! राज्यात पावसाची आणखी दडी, सरकारकडून पाणीकपातीचे मोठे संकेत
- तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर पुन्हा बदलीची चर्चा, ग्राहक पंचायतीचा मुख्यमंत्र्यांना इशारा













