🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांवर सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी केला आहे. इतकंच नाही तर, उमेदवारांना फोन करणाऱ्या अधिकाऱ्यांची “गाढवावरून धिंड काढू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दानवे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. संभाजीनगरात विशेषतः सत्ताधारी मंत्री हे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना आणि उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. “उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा पाहून घेऊ,” अशा स्वरूपाचा दबाव टाकला जात असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही शासकीय अधिकारीही उमेदवारांना फोन करून दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Ambadas Danve Warns Officials | Sambhajinagar Election News
या प्रकारावर संताप व्यक्त करताना अंबादास दानवे म्हणाले की, “मी या लोकांना इशारा देतोय की, घोडा मैदान जवळ आहे. एकेकाचा हिशोब ठेवला जाईल. विशेषतः ज्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना फोन केले आहेत, त्यांची गाढवावरून मिरवणूक काढली नाही, तर नाव अंबादास दानवे लावणार नाही.” दानवे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मी सर्व फोन रेकॉर्ड्स जपून ठेवले असून, वेळीच उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. मंत्री आपल्या पदाचा गैरवापर करत असून अधिकारी त्यांना साथ देत आहेत. आयोगाने कारवाई न केल्यास शिवसैनिक आपल्या पद्धतीने योग्य तो धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी ( Ambadas Danve ) शेवटी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ग्राहकाने दाखवला इंगा! १० रुपयांच्या ‘सर्व्हिस चार्ज’पायी हॉटेलला भरावा लागला ५० हजारांचा दंड
- निवडणूक अर्ज छाननीवरून राडा; “सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय, आणि आम्हाला…”, मनसेचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
- तिकीटासाठी निष्ठेचा लिलाव; ठाण्यात ८ दिवसांत ३ पक्ष बदलणाऱ्या गुन्हेगाराला उमेदवारी, निष्ठावंतांना अश्रू अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












