🕒 1 min read
मुंबई– दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई शहराची तुंबई झाली. रुग्णालयात पाणी घुसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आणि भुयारी मेट्रो स्थानकातही पाणी घुसल्याने सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“मुंबई-ठाणे बुडाले, पण एकनाथ कुठंय?” असा सवाल करत राऊतांनी म्हटले की, “एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री आहेत, पण ते महाराष्ट्र द्रोह्यांच्या लांगुलचालनात गुंतले आहेत.” त्यांनी भाजपवरही हल्लाबोल करत म्हटले, “हे व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. मुंबईला शेअर बाजारासारखं जुगारावर लावण्याचा कट आहे.”
Sanjay Raut Slams Eknath Shinde After Mumbai Rains Flood
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, अमित शाह (Amit Shah) आहेत कोण? देशावर लादलेले गृहमंत्री आहेत ठीक आहे.. मुंबईत काल महापूर आला. ही जबाबदारी कोणाची आहे तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कोणाकडे आहे? मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडालं एकनाथ कुठंय? एकनाथ शिंदे अमित शाहांचं (Amit Shah) लांगुणचालन करण्यात व्यस्त आहेत. एकनाथ कुठंय तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या लांगुणचालनात आहे.
संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधत विचारलं, “साडेतीन वर्ष सत्ता तुमच्याकडे, काही झालं की, अजूनही नेहरू-मनमोहन यांचं नाव का?” मोठा गाजावाज करत मुंबईतील भुयारी मेट्रोचं उद्घाटन केलं. काल जनतेचे हजारो कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- “घरात न्याय नाही, मग समाजाला काय?” अंजली दमानियांचा संजय शिरसाटांवर घणाघात
- “मोदी, शाह, फडणवीस यांची नावे घेतलीस तर याद राख!” नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा
- विवाहित महिलेशी बौद्ध पद्धतीने लग्न, मग जबरदस्तीने गर्भपात? महिला आयोग गप्प? इम्तियाज जलील यांची संतप्त प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












