🕒 1 min read
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Monsoon Session ) पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे .
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून महायुतीला फटका बसला आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक ही आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच आता आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विविध मुद्यावरून जुंपणार आहे . आज सरकारच्या वतीने अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार असून 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार आहे
या अधिवेशनात पावसामुळे खंड पडल्याने राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, शेतकऱ्यांचा प्रश्न , शेतकरीला मदत न करने – शेतकरीला पीक कर्ज न देने तसेच मराठा विरुद्ध ओबीसी वाद ,राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक मुद्द्यावरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे . मात्र यावेळी सरकार आपली बाजू सावरण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत मोठ्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभेसाठी आघाडीतील नेत्यांनी जोरदार कंबर कसली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दणका; जामिनावरील पुढील सुनावणी २६ जूनला
- विधानसभेसाठी शरद पवार ॲक्शन मोडमध्ये; ‘चिन्हासाठी’ निवडणूक आयोगात धाव
- मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्ली दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











