🕒 1 min read
Walmik Karad । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ( Santosh Deshmukh Murder Case ) अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. पण दिवसेंदिवस हे प्रकरण वेगळे वळण घेत आहे.
अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर ( Walmik Karad ) ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी यांसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
“वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. आवादा कंपनीतल्या दलित वॉचमनला खंडणीच्या प्रकरणावरुनच मारहाण करण्यात आली. मात्र वॉचमन दलित समाजाचा असल्याने गावातल्या सरपंचाने म्हणजे संतोष देशमुख यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि खंडणी मागणाऱ्यांना तिथून जायला सांगितलं. त्याचा बदला म्हणून संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
या प्रकरणाचे धागेदोरे हे स्पष्टपणे वाल्मिक कराडपर्यंत जातात. त्यामुळे वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केलीय. या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! Sudarshan Ghule बाबत धक्कादायक माहिती आली समोर
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर Chhagan Bhujbal म्हणाले, “मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून…”
- Manoj Jarange यांनी गुन्हा दाखल केल्यांनंतर दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, त्याचा राग म्हणूनच …
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










