Vande Mataram Legal Protection Bill : राज्यसभेने ‘राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२६’ मंजूर केले आहे. या सुधारणेअंतर्गत, ‘वंदे मातरम’ (Vaande Mataram) या राष्ट्रगीताशी संबंधित बाबींना कायदेशीर संरक्षण (Legal Protection) दिले जाईल. हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर, जो कोणी मुद्दाम ‘वंदे मातरम’चा अवमान करेल किंवा हे राष्ट्रगीत गाण्यात अडथळा आणेल, त्याला तीन वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
‘राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२६’ (Prevention of Insults to National Honour (Amendment) Bill, 2026) मुळे ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला आता कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. विधेयकानुसार, राष्ट्रगीताचा मुद्दाम अवमान करणे किंवा त्यात अडथळा आणणे हा फौजदारी गुन्हा मानला जाईल. विरोधी पक्षांचा विरोध आणि गदारोळ यांच्यात हे विधेयक मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित प्रतीकांना कायदेशीर संरक्षण देणे, हा यामागचा उद्देश असल्याचे सरकारने सांगितले.
ही सुधारणा ‘राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, १९७१’ ची व्याप्ती वाढवते. यापूर्वी, या कायद्यांतर्गत राष्ट्रध्वज, संविधान आणि ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण होते. आता त्यात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताचाही समावेश करण्यात आला आहे. ‘वंदे मातरम’ गाण्यापासून मुद्दाम रोखणे, त्यात अडथळा आणणे किंवा त्याचा अवमान करणे यांसारख्या कृती या विधेयकानुसार शिक्षेस पात्र असतील. ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतानाच हे विधेयक मंजूर करण्यात आले.
नवीन कायद्यातील तरतुदी काय?
या सुधारणा विधेयकाचा उद्देश राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत यांच्याप्रमाणेच ‘राष्ट्रगीता’लाही (National Song) समान कायदेशीर संरक्षण प्रदान करणे हा आहे. या कायद्यांतर्गत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणे, ते गाण्यात जाणीवपूर्वक अडथळा आणणे किंवा राष्ट्रीय प्रतिष्ठेला बाधा आणणारी कोणतीही कृती करणे या गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतील. राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमानाशी संबंधित गुन्ह्यांसाठी या विधेयकात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “…तर हेच विद्यार्थी भविष्यात सरकार बदलतील”; अभिजित दीपकेचा कडक इशारा
- Coal Scam प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; मनमोहन सिंग यांना अखेर मोठा दिलासा
- राहुल गांधींच्या ‘अंधभक्त’ विधानाने संसदेत खळबळ; राजनाथ सिंहांचा तीव्र आक्षेप













