🕒 1 min read
Unseasonal Rain | राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असून, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके हातात येण्याच्या अंतिम टप्प्यावर असताना अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. आज पुन्हा एकदा राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पावसाचा अनुभव आला. जळगावमध्ये अनेक भागांत गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. या गारपिटीमुळे गहू, मका, कांदा, केळी आणि फळपिकांचे सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुण्यात जुन्नर तालुक्याला पावसाचा तडाखा
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातही दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी पावसाची हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची फळबागेची मोठी हानी झाली आहे. मात्र, यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाल्याचेही पाहायला मिळाले.
गोंदिया जिल्ह्यात हवामानात बदल, प्रशासन सतर्क
गोंदिया जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, वादळी वाऱ्यांना सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Unseasonal Rain Causes Big Crop Loss in Maharashtra
राज्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याच्या प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात आईकडून मुलीचा अमानुष छळ; अश्लील व्हिडीओ करून व्हायरल करणाऱ्या प्रियकरासह अटकेत
- RCB चा विराट विजय! जयपूरच्या मैदानावर राजस्थानचा ९ विकेट्सनी पराभव
- Sinhagad Fort | परदेशी पर्यटकाला मराठीत शिवीगाळ करण्यास भाग पाडले; पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










