🕒 1 min read
नाशिक- राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकर यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नाशिकचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी थेट इशारा दिला की, “राहुल गांधी नाशिकमध्ये आले, तर त्यांना तोंड काळं करून दाखवू!”
दराडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही सावरकरांची भूमी नाशिकचे रहिवासी असून, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही राहुल गांधींना यापूर्वी चांगलंच सुनावलं आहे.”
Uddhav Thackeray’s Shiv Sena Warns Rahul Gandhi
दराडे यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीवरही निशाणा साधत म्हटले, “महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, आमच्यासाठी सावरकर आणि हिंदुत्व हाच सर्वोच्च मुद्दा आहे.”
या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजीचे संकेत मिळत असून, महाविकास आघाडीत फूट पडण्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे. विशेषतः सावरकर प्रकरणामुळे युतीतील तणाव अधिक वाढू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लग्नात पिस्तूल बाहेर, शिवतारेंच्या नात्यातील भांडणातून थरारक प्रसंग, पाहुण्यांपुढेच धमकी!
- “पैसे कुठून आले? शिंदे-शाहांनी दिले का?” शिरसाटांच्या ६७ कोटींच्या प्रॉपर्टीवर राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
- “तक्रार करू नका, अजित पवारांच्या मागे लागा!” पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शाह यांचा कानमंत्र!













