🕒 1 min read
पुणे/मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये (Indian Automobile Market) सध्या टाटा मोटर्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परदेशी कंपनी ह्युंदाई आणि देशी स्पर्धक महिंद्रा अँड महिंद्राला मागे टाकत टाटा मोटर्स (Tata Motors) आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार कंपनी बनली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ (Q3 FY26) या तिमाहीत टाटाने ही विक्रमी झेप घेत मार्केटमधील समीकरणे बदलून टाकली आहेत.
Tata Motors Becomes No 2 Car Maker
केंद्र सरकारच्या ‘वाहन’ (VAHAN) पोर्टलवरील आकडेवारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत टाटा मोटर्सने तब्बल १ लाख ८९ हजार गाड्यांची नोंदणी केली. याच काळात महिंद्राने १.८० लाख तर ह्युंदाईने १.७० लाख गाड्या विकल्या. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातही टाटाने ५१,९६३ युनिट्ससह बाजी मारली आहे. या ऐतिहासिक यशामागे टाटाची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही ‘नेक्सॉन’ (Nexon) आणि नोव्हेंबरमध्ये लाँच झालेली ‘सिएरा’ (Sierra) यांचा सिंहाचा वाटा आहे. नेक्सॉनने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले, तर २१ वर्षांनंतर परतलेल्या ‘सिएरा’ला ग्राहकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.
टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्रा यांनी या यशाचे श्रेय GST 2.0 सुधारणा आणि ग्राहकांचा एसयूव्हीकडे वाढलेला कल याला दिले आहे. याशिवाय टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीत ४९.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जरी २०२५ च्या वार्षिक आकडेवारीनुसार टाटा अजूनही तिसऱ्या क्रमांकावर असली, तरी वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांतील हा ‘उलटफेर’ प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवणारा ठरला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संभाजीनगरात राडा! “गाढवावरून धिंड काढू”; अंबादास दानवे अधिकाऱ्यांवर का भडकले? पाहा व्हिडिओ
- ग्राहकाने दाखवला इंगा! १० रुपयांच्या ‘सर्व्हिस चार्ज’पायी हॉटेलला भरावा लागला ५० हजारांचा दंड
- निवडणूक अर्ज छाननीवरून राडा; “सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय, आणि आम्हाला…”, मनसेचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








