🕒 1 min read
सोलापूर – राजकारणात मैत्री आणि दुश्मनी कधीच कायम नसते, पण जेव्हा दोन भाऊ एकत्र येतात तेव्हा तिसऱ्याला पोटशूळ उठतोच, असं म्हणतात. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिंदे गटाच्या ‘तोफखान्या’ने, अर्थात शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी पहिलंच मोठं भाकीत वर्तवलं आहे. “उद्धव ठाकरेंच्या नादाला लागून राज ठाकरे स्वतःचं नुकसान करून घेत आहेत,” असा दावा करत बापूंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
Shahajibapu Patil on Raj Thackeray
शहाजीबापू पाटील हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा केवळ वापर करून घेतील आणि त्यांना निस्तेज करतील,” असं सनसनाटी विधान बापूंनी केलं आहे.
त्यांनी पुढे जाऊन असाही दावा केला की, या युतीमुळे राज ठाकरेंचं वलय आणि अस्तित्व हळूहळू संपत जाईल. एकीकडे राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमते, पण दुसरीकडे शहाजीबापूंनी त्यांना ‘संपणार’ असं म्हटल्याने मनसैनिक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
शहाजीबापूंनी फक्त राज ठाकरेंनाच टार्गेट केलं नाही, तर त्यांचे जुने मित्र संजय राऊत यांचाही चांगलाच समाचार घेतला. महायुतीच्या प्रचारासाठी आपण लवकरच मुंबईत येणार असल्याचं बापूंनी जाहीर केलं. यावेळी बोलताना, “मी मुंबईत प्रचाराला येणार आणि संजय राऊतांसारख्याला तर कस्पटासारखा उडवून लावणार,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.
बापूंच्या या ‘डॅशिंग’ अवतारामुळे मुंबईतल्या प्रचारात चांगलीच रंगत येणार हे नक्की. आता बापूंच्या या टीकेला ठाकरे बंधू आणि संजय राऊत कसं उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘काय ती झाडी…’ फेम शहाजीबापू मुंबईत; संजय राऊतांना दिलं ओपन चॅलेंज, म्हणाले, “कस्पटासारखं उडवेन!”
- ‘ते’ काम अजित पवार करतायत, आपल्याला गरज नाही; उदय सामंतांनी भाजपला दाखवला आरसा!
- महायुतीत भूकंप! “मी फडणवीसांना आधीच सावध केलं होतं…”; अजित पवारांबाबत रवींद्र चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










