sadabhau khot vs sharad pawar । सदाभाऊ खोत यांनी जतमधील महायुतीच्या सभेत शरद पवार यांच्या आजारपणावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले “आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?. महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुला कसला चेहरा पाहिजे?, अशी वादग्रस्त टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
“अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असे वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केली.
पुढे बोलताना खोत म्हणाले, “राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांना का घेरलं? माहिती आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, गायीची जी कास आहे त्या कासेला चार थाणे आहेत. या अर्धा थाण वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थाणातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणे ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
महत्वाच्या बातम्या