🕒 1 min read
मुंबई | २७ एप्रिल: पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, अभिनेत्री राखी सावंतने काश्मीरला जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तिने चाहत्यांना काश्मीरला सुट्टीसाठी जाण्याचं आवाहन केलं आहे.
राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर बुरखा परिधान करून व्हिडिओ शेअर केला आहे. तिने काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं, “आपल्याला काश्मीरचं पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपण सर्वांनी काश्मीरला जाऊन तिथल्या काश्मिरी जनतेला पाठिंबा द्यायला हवा. काश्मीर आपलं आहे.”
राखी पुढे म्हणाली, “आपल्याला भारताबाहेर सुट्टी घालवण्याऐवजी काश्मीरला जाण्याचा संकल्प करायला हवा. तिथल्या लोकांनी आणि सैनिकांनी आपल्या संरक्षणासाठी प्राण दिले आहेत. आपल्याला त्यांची मदत करायला हवी.”
Rakhi Sawant Urges Fans to Visit Kashmir | Unity After Pahalgam Attack
या व्हिडिओमध्ये राखीने हिंदू-मुस्लिम एकतेवरही भर दिला. तिने सांगितलं, “भारत जितका हिंदूंचा आहे, तितकाच मुसलमानांचा आहे. आपण सर्व एकत्र राहायला शिकायला हवं.”
महत्वाच्या बातम्या
- “साजिद खानने मला घरी बोलावलं आणि म्हणाला आता कपडे काढून..”, अभिनेत्री नवीनाचे गंभीर आरोप
- जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यावर मुंबईचा लखनौवर ५४ धावांनी सलग पाचवा विजय
- “आमच्याकडे १३० अणुबॉम्ब, सजवून ठेवण्यासाठी नाहीत”; पाकिस्तानची भारताला धमकी