Share

Prakash Ambedkar | भुजबळांना जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती? प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल

Prakash Ambedkar |  अकोला: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज जालन्यामध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांना धारेवर धरलं.

यावर प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांना मनोज जरांगे यांना आव्हान देण्याची काय गरज होती? असा संतप्त सवाल प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी उपस्थित केला आहे.

What was the need for Chhagan Bhujbal to challenge Manoj Jarange? – Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले, “ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, त्यांच्या या षड्यंत्रावर पाणी फिरण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊ.

आज झालेल्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांना मनोज जरांगे यांना आव्हान देण्याची काय गरज होती? कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीमध्ये बसून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडून काय मिळणार आहे?”

महत्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar |  अकोला: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now