Share

कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह! ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हा निकाल दुर्दैवी”

20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले असून, हा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Published On: 

ओमराजे निंबाळकर म्हणाले— “हा निकाल दुर्दैवी”

🕒 1 min read

मुंबई : पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) हत्या प्रकरणात तब्बल 20 वर्षांनंतर आलेल्या निकालानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली आहे. त्यात माजी मंत्री पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil)  यांचाही समावेश आहे.

या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय “दुर्दैवी” असल्याचे म्हटले आहे. मागील 20 वर्षांपासून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. “हा निकाल आम्हाला धक्का देणारा आहे. मात्र आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत आणि शेवटपर्यंत न्यायासाठी लढा सुरू ठेवणार आहोत,” असे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला मुंबई पोलीस आणि त्यानंतर सीआयडीकडून तपासावर दबाव होता. त्यामुळे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआय तपासानंतरही अखेर न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिल्याने त्यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले. “वाईटाला लवकर बळ मिळते, पण चांगल्याला उशीर होतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही