🕒 1 min read
मुंबई : पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) हत्या प्रकरणात तब्बल 20 वर्षांनंतर आलेल्या निकालानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली आहे. त्यात माजी मंत्री पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil) यांचाही समावेश आहे.
या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय “दुर्दैवी” असल्याचे म्हटले आहे. मागील 20 वर्षांपासून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. “हा निकाल आम्हाला धक्का देणारा आहे. मात्र आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत आणि शेवटपर्यंत न्यायासाठी लढा सुरू ठेवणार आहोत,” असे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला मुंबई पोलीस आणि त्यानंतर सीआयडीकडून तपासावर दबाव होता. त्यामुळे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआय तपासानंतरही अखेर न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिल्याने त्यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले. “वाईटाला लवकर बळ मिळते, पण चांगल्याला उशीर होतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojna: अखेर तारीख ठरली! २३ वा हप्ता खात्यात जमा होणार, पण ‘ही’ एक अट पूर्ण केलीय का?
- ठाकरे गटात खळबळ! भास्कर जाधवांचा थेट स्वपक्षाला ‘घरचा आहेर’, कारवाईची तयारी ठेवत मोठा गौप्यस्फोट
- संजय राऊतांच्या शेजारी बसलेला ‘तो’ खासदारही फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












