🕒 1 min read
Eknath Shinde | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होताच, सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपली आहे. नेते मंडळी आरोप करण्याची कुठलीच संधी सोडताना दिसत नाही आहेत.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे, ते म्हणाले की, ”महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तर स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या महाआघाडीत लवकरच बिघाडी होईल, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ”राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही. महायुती समन्वयाने लढेल. आघाडीच्या गोठात चलबिचल असून ‘मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा’, असे बॅनर आणि पोस्टर गल्लीगल्लीत फिरत आहेत. त्यामुळे आघाडीतील चलबिचल दिसत आहे.
आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ती विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या महाआघाडीत लवकरच बिघाडी होईल” अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
विरोधकांना पराभव समोर दिसू लागला की त्याचे खापर ईव्हीएमवर, निवडणूक आयोगावर फोडतात हे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील ढरे येथे आपल्या मूळ गावी ग्रामदैवताच्या दर्शनासाठी आले आहेत.
Mahavikas Aghadi Alliance break down Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांना दुबईमध्ये दाऊद इब्राहीमने सोन्याचा हार घातला; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
- मतदानासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत
- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय सूक्ष्म नियोजन करा – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










