जळगाव– राजकारणात खुर्ची टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं? कधी कोणाशी हात मिळवावा लागतो, तर कधी चक्क ‘आय लव यू’ म्हणावं लागतं. हे आम्ही नाही, तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सांगतायत. जळगावच्या धरणगावमध्ये प्रचारसभेत गुलाबराव पाटलांची तोफ चांगलीच धडाडली आणि त्यांच्या मिश्किल विधानांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.
Minister Gulabrao Patil Speech
येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना गुलाबरावांनी सत्तेत असल्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या. “मला प्रॉब्लेम आहे, मी सरकारमध्ये आहे. त्यामुळे मला सर्वांसोबत ‘आय लव यू’ (I Love You) करावं लागतं, माझी जबाबदारी सांभाळून मला बोलावं लागतं,” अशी कबुली त्यांनी भरसभेत दिली. मात्र, आमदार किशोर पाटलांना ही अडचण नसल्याने ते दंड थोपटू शकतात, असंही त्यांनी हसत-खेळत सांगितलं.
सभेत फक्त विनोद झाले नाहीत. गुलाबरावांनी आमदार किशोर पाटील यांना थेट भाजपपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. “तुम्ही तुमच्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही, हे मला माहीत आहे,” असं सांगत त्यांनी पाचोरा-भडगाव पॅटर्नचा दाखला दिला. तिथे शिवसेनेने स्वतंत्र लढून भाजपला धूळ चारली होती, याचे संकेत देत त्यांनी (Gulabrao Patil) आगामी काळात भाजपशी युती न करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
‘ जुन्या आठवणींना उजाळा देताना गुलाबरावांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. “१९९६ मध्ये धरणगावचा नगराध्यक्ष करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा मी नगरसेवकांना घेऊन चक्क झुरखेड्याला पळून गेलो होतो,” हा किस्सा त्यांनी सांगितला. तसंच, निवडून आल्यावर ज्यांना ‘हवा’ लागते, अशा नगरसेवकांचे त्यांनी चांगलेच कान टोचले. “दोन मोबाईल आणि चार माणसं हाताशी आली की हे लोक बदलतात. जे डोक्यावर घेतात, तेच नंतर आपटतात,” असा सज्जड दमही त्यांनी (Gulabrao Patil) दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- कॅलेंडरमध्ये तारखा नोंदवून ठेवा! २०२६ मध्ये ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान; कोलंबोमध्ये होणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा
- शतक ठोकूनही ‘शिक्षा’? ऋतुराज गायकवाड OUT; गंभीर-आगरकरच्या निर्णयावर अश्विनचा पारा चढला!
- १४७, १२४, ११३, १०८… आकडे बोलतायत! ५ सामन्यात ४ शतकं ठोकूनही ‘या’ पठ्ठ्याला टीम इंडियात ‘नो एन्ट्री’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











