🕒 1 min read
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भुजबळांनी आज शपथ घेतली.
छगन भुजबळांच्या मंत्रिपदावर नियुक्ती झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भुजबळ पुन्हा पदावर आल्याने वाडी-तांडा, प्रभू श्रीराम आणि भगवान बाबांचे श्रद्धास्थान मानणाऱ्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भुजबळ मंत्री झाल्यामुळे जनतेला समजलं आहे की, हे सरकार भटक्या विमुक्तांचं आहे,” असं त्यांनी म्हटलं.
Chhagan Bhujbal Becomes Minister Again
याचवेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. “कायद्याची पायमल्ली करू नका, भटक्या-विमुक्तांना छेडू नका, ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यावर चुकीचं बोलण्याची हिंमत करू नका,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही छगन भुजबळांचं स्वागत केलं. “आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, भुजबळांना आज न्याय मिळाला आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्राला होईल,” असं त्यांनी सांगितलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- छगन भुजबळ पुन्हा मंत्रिपदावर; सदावर्ते म्हणतात, “हे भटक्या-विमुक्तांचे सरकार”
- CSK आणि RR यांच्यातील अखेरचा साखळी सामना – कोण जिंकेल IPL 2025 चा सामना?
- ऋषभ पंतला स्वतःचं रोल माहित नाही! मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










