🕒 1 min read
Anjali Damania । बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राजकीय वर्तुळात देखील यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळतेय. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे.
अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात सवाल उपस्थित केले आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा ( Pankaja Munde ) आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या “उच्च पदावरील माणसं फक्त परळीमधील का? असा सवाल मी अभ्यासपूर्वक केला होता. मी ट्वीटरवर दोन ट्विट्सही टाकले. भगवान बाबांसारखे संत होते, ते शैक्षिणिक, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, ते नेहमी वंदनीय आहेत, मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे असं एका चकार शब्दाने म्हटलं नाही. पण त्यातील माझा उल्लेख काढून काही लोकांनी समाजातील सर्व लोकांना पाठवण्याचं काम केल्याने मला आता सातत्याने फोन येत आहेत.”
त्याचबरोबर फोननंबर फेसबूकवर टाकून अश्लील पोस्ट देखील टाकण्यात आल्या असल्याचं दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या. “नरेंद्र सांगळे यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला होता. हा माणूस उठसूठ फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोननंबर फेसबूकवर टाकलाय. तसंच, काही पोस्ट केल्या असून खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचं दिसतंय. मला पहिल्या दिवशी ७०० ते ८०० फोन आले. आज चौथा दिवस आहे”, असंही त्यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘त्या’ वक्तव्यावरून Abhijeet Bhattacharya यांना लीगल नोटीस; नेमकं प्रकरण काय?
- Santosh Deshmukh । धक्कादायक! आरोपींनी रेल्वे स्टेशनवर ‘ती’ बातमी पाहिली अन्….
- राष्ट्रवादीने Chhagan Bhujbal यांचे खूप लाड केले, त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात- माणिकराव कोकाटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










