🕒 1 min read
Ajit Pawar । सत्ताधाऱ्यांसह विरोधकदेखील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यामुळे धनंजय मुंडेंची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
“एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये नाव आले तर आपण कारवाई करणार आहोत. ज्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे (Irrigation Scam) आरोप झाले होते त्यावेळी मी राजीनामा दिला होता. कारण माझ्या बुद्धीला ते पटले नाही,” असे अजित पवार म्हणाले.
“1992 सालापासून आजपर्यंत काम करताना मला बदनाम करण्यात आले. माझी प्रतिमा खराब केली. इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत असल्याने मी राजीनामा दिला होता. काही जणांवर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. पण आताची परिस्थिती वेगळी आहे,” असे म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे मुंडेंची पाठराखण केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावं. पुरावा नसेल म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला नसेल. धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितले आहे की यात माझा काहीच संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh murder case) सांगितले आहे की दोषींवर कारवाई केली जाईल. आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही. जनतेने आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar on Dhananjay Munde
दरम्यान, एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे आता अजित पवार यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे मुंडे राजीनामा देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Deshmukh यांची मोठी मागणी, म्हणाले; “Krishna Andhale ला पकडून..”
- Mumbai Indians ची वाढली ताकद, T20 मध्ये 330 विकेट घेणारा गोलंदाजाची संघात एन्ट्री
- “धनंजय मुंडे, Suresh Dhas, बजरंग सोनवणे एकाच गँगमधील, त्यांना..”; मनसेचा जोरदार हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











