🕒 1 min read
राज्याच्या तिजोरीवर नेमका पहिला हक्क कुणाचा? हा प्रश्न अनेकदा राजकीय वर्तुळात विचारला जातो. आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर थेट उत्तर देत बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे.
‘राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार फक्त शेतकऱ्यांचा आहे,’ अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली. सरकारने कर्जमाफीच्या ५० हजारांच्या अटीत मोठा बदल केला आहे.
Eknath Shinde on Hindutva
ही अट शिथिल केल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. महायुती सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘जनतेने शिक्षा दिल्यावर आता त्यांना रामरक्षा आठवू लागली आहे. हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट नाही, जो रोज बदलता येईल. तो विचारांशी जोडलेला विषय आहे,’ असा घणाघात शिंदे यांनी केला. राम मंदिरावर टीका करणारे आता रामरक्षा म्हणत आहेत, हा मोठा विरोधाभास असल्याचं ते म्हणाले.
शरद पवार नेहमी चांगल्या कामाचं कौतुक करतात, पण काही विरोधी पक्षनेते मात्र सरकारच्या प्रत्येक निर्णयावर फक्त टीका करण्यात धन्यता मानतात, असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारून दिलेला शब्द पाळल्याची आठवण त्यांनी करून दिली.
पक्षात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची योग्य सांगड घालत शिवसेना नेहमीच दिलेला शब्द पाळेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- हवामान विभागाचा महाराष्ट्राला गंभीर इशारा, पुढील २४ तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस
- हातात बाळ, अंगात ‘तो’ टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केला फोटो, टी-शर्टवरील शब्दांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ!
- माझं आणि त्याचं नातं खूप आधीपासून..! रिंकू राजगुरूच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचं रहस्य अखेर उलगडलं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












