🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- राजकारणात शब्दांचे वार किती तीक्ष्ण आणि जिव्हारी लागणारे असू शकतात, याचा अनुभव आज पुन्हा एकदा आला. “१९८८ मधील शिवसेनाप्रमुखांच्या त्या ऐतिहासिक सभेची आज आठवण झाली,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत अक्षरशः रान उठवलं. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी भाजप आणि रावसाहेब दानवे यांच्यावर शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला.
शिवसेनेची पुन्हा नव्याने सुरुवात करत असल्याचा एल्गार यावेळी ठाकरेंनी पुकारला. “ज्यांना ज्यांना पक्षाने भरभरून दिलं, ते खाऊन माजले आणि गद्दार झाले. पण या गद्दारीने आपले काहीच बिघडले नाही,” असा टोला त्यांनी लगावला. आज आपल्यासोबत अनेक नवे आणि तरुण चेहरे येत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Uddhav Thackeray Speech vs Raosaheb Danve
पण भाषणाचा खरा “हायलाईट” ठरला तो भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर केलेला वैयक्तिक प्रहार! ठाकरे यांनी दानवेंचा उल्लेख ‘पराभूत खासदार’ असा करत म्हणाले, “निवडणुकीत पडले तरी यांची मस्ती आणि माज काही कमी झालेला नाही.”
दानवेंनी मध्यंतरी ‘आमच्याकडे सगळे पक्ष जेवून गेलेत’ असं विधान केलं होतं. या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी थेट वर्मावर घाव घातला. “जर हे खरं असेल, तर मग तुम्ही आमच्या ताटातलं उष्टं खरकटं का खाताय? स्वतःच्या ताकदीवर तुमचं पोट का भरत नाही? इतकं खाऊनही तुमची भूक का संपत नाही?”
Uddhav Thackeray यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता याला भाजप आणि खुद्द रावसाहेब दानवे काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
- ‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












