🕒 1 min read
Sanjay Shirsat । नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबच्या कबरीला (Aurangzeb Tomb) हटविण्यावरुन काल दोन गटांत भीषण राडा झाला. याच पार्श्ववभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू केले आहे. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर (MVA) निशाणा साधला आहे.
“ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे, त्या ठिकाणी मस्लिम लोक जात नाहीत. मुस्लिमांना कबरीशी काहीच देण-घेण नाही. नागपूरमध्ये घडलेली कालची घटना ही महाविकास आघाडीने घडवून आणली आहे,” असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, “ही लोक अशी मुर्खपणाची वक्तव्य करत आहेत. त्यांना आम्ही मानत नाही. विरोधकांना कालची घटना अंगलट आली आहे हे त्यांना समजलं आहे. राज्यात आम्हाला कुठेही दंगल नको आहे,” असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.
“छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास जर औरंगजेबामुळे लिहायचा असं जर यांचं संशोधन असेल तर महाराजांच्या बाजूला औरंगजेबाचा पुतळा उभा करायाचा आहे का?,” असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
Sanjay Shirsat criticize MVA
दरम्यान, नागपूरमधील घडलेल्या घटनेला संजय शिरसाट यांनी थेट महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. यामुळे राजकीय वातावरण चिघळू शकते. यावर आता महाविकास आघाडी काय उत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- “फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले का जीभ…”; Eknath Shinde यांचा संतप्त सवाल
- मागील जन्मात Narendra Modi छत्रपती शिवाजी महाराज…” भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
- Sanjay Raut यांनी सांगितला दंगलीचा नवीन पॅटर्न, म्हणाले; “आधी हिंदूवर हल्ले करून…”









