Share

Maharashtra Rain: राज्यात पाऊस घेणार ब्रेक, कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

Monsoon takes a short break in Maharashtra (Maharashtra Rain) with light rainfall expected only in a few regions. Agriculture department advises farmers to delay sowing till after June 12.

Published On: 

Maharashtra Rain: Rain will take a break in the state; Agriculture Department's important advice to farmers | IMD alerts

मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने (Maharashtra Rain) मे महिन्यातच दमदार हजेरी लावली होती. मात्र सध्या राज्यात पावसाची गती मंदावली असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील १२ जूनपर्यंत पावसाने विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून अनेक भागांत पावसाने खंड घेतला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाची चिन्हं नाहीत, त्यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे.

Maharashtra Rain: Rain will take a break in the state

हवामान विभागाने विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर भागांमध्ये तुरळक किंवा हलक्या सरींची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला:

कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण मान्सूनची गती मंदावल्यामुळे पुढील काही दिवसात पुरेसा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. १२ जूननंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही