Share

राज्यात पावसाचा कहर! मुंबईसह अनेक जिल्ह्यांत यलो आणि रेड अलर्ट

IMD issues red and yellow alerts across Maharashtra. Mumbai, Jalgaon, and Ratnagiri face heavy rain and thunderstorms. Monsoon brings relief and danger alike.

Published On: 

Monsoon Update - Heavy rain falling on agricultural fields in Maharashtra.

मुंबई: राज्यात मान्सूनचं (Maharashtra Rain Alert) दमदार आगमन झालं असून येत्या काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे यलो आणि रेड अलर्ट (red and yellow alerts) जारी करण्यात आले आहेत. 27 मे ते 2 जून दरम्यान जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

🌧️ मुंबईतील पावसाची स्थिती

मुंबईत कालपासून रिमझिम पावसासह समुद्रकिनारी उंच लाटांनी हजेरी लावली होती. आज मात्र सकाळपासून दादर चौपाटी परिसरात ओहोटीमुळे पाणी कमी झाल्याचं दिसून आलं. हवामान खात्याने हाय टाईडचा इशारा दिल्यामुळे किनाऱ्यांवरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे.

Rain havoc in the state! Yellow and red alert in many districts including Mumbai

⛈️ जळगावमध्ये विजांसह पाऊस

जळगाव जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरू आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. फळबागांना फटका बसला असून मशागतीची कामं लांबणीवर पडली आहेत.

🌾 गोंदियात मान्सूनची हजेरी

गोंदिया जिल्ह्यात मान्सून पोहोचला आहे. उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना थोडासा गारव्याचा दिलासा मिळाला, मात्र शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

🌳 झाडांची कोसळणारी संख्या चिंताजनक

मे महिन्यात पूर्वमोसमी वादळांमुळे 254 झाडं कोसळली आहेत. झाडांच्या कोसळण्यामुळे एक नागरिकाचा मृत्यू झाला असून, विकासकामांमुळे झाडांच्या मुळांवर परिणाम झाल्याची चर्चा आहे. झाडपड्याच्या घटना जानेवारीपासून सतत वाढत आहेत:

महिना झाडपड्याच्या घटना
जानेवारी    25
फेब्रुवारी    29
मार्च         39
एप्रिल       72
मे          254

🌊 कोकणात नद्यांची पाणीपातळी

रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून जगबुडी, वाशिष्ठी, काजळी नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या 48 गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

🚨 प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जालना जिल्ह्यातील 47 गावांना पुराचा धोका असल्याने आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालं आहे. नागरिकांना ‘दामिनी अ‍ॅप’ डाउनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं असून, आपत्तीच्या वेळी 1077 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही