🕒 1 min read
IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या विजयी मालिका वानखेडे स्टेडियमवर चालू ठेवत, लखनौ सुपर जायंट्सचा सहज पराभव केला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने लखनौसमोर 216 धावांचं लक्ष्य ठेवत 54 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा सलग पाचवा विजय नोंदला गेला असून प्लेऑफच्या शर्यतीत मुंबईने आपलं स्थान भक्कम केलं आहे.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 215 धावा केल्या. रायन रिकेल्टनने 32 चेंडूत 58 धावांची दमदार खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 54 धावांची आक्रमक खेळी साकारली. अखेरच्या षटकांत नमन धीर (25 नाबाद) आणि कॉर्बिन बॉश (10 धावा) यांनी मिळून 45 धावांची मोलाची भर घातली, ज्यामुळे मुंबईला 200 धावांचा टप्पा गाठता आला.
IPL 2025: Mumbai Indians Thrash Lucknow Super Giants by 54 Runs
प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा डाव मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे कोलमडला. जसप्रीत बुमराहने 4 बळी घेत निर्णायक घाव घातला. लखनौचा संघ 20 षटकांत 161 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईने हा सामना 54 धावांनी जिंकला.
विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने नमन धीर आणि कॉर्बिन बॉशच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत सांगितले, “आम्हाला गेम कधी आणि कसा फिनिश करायचा ते माहीत आहे,” असे तो म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कृणाल पंड्याच्या शानदार खेळीने आरसीबीचा दिल्लीवर दणदणीत विजय, गुणतालिकेत अव्वल स्थान
- विराट कोहली आणि केएल राहुल सामन्यात भिडले; व्हिडीओ झाला व्हायरल
- ‘तो’ किस सीन कट कर म्हणाल्यावर निर्माता म्हणाला, ‘माधुरी, तुला त्यासाठी एक कोटी दिलेत!’