🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपने ‘हायजॅक’ केल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. “राहुल जे बोलले, तेच आम्ही पूर्वीपासून सांगतो आहोत,” असं राऊत म्हणाले.
राऊतांनी आरोप केला की, “लाडकी बहीण” योजनेच्या नावाखाली भाजपने निवडणूक हातात घेतली. त्यांनी थेट भाजपवर लोकशाही आणि निवडणूक यंत्रणेवर कब्जा केल्याचा आरोप केला. “ते तर २५ जागा जिंकू शकत नव्हते, मग एवढा एकतर्फी विजय कसा शक्य झाला?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
BJP Hijacked Maharashtra Election – Sanjay Raut
राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार जर कोणी मिळवायचा असेल, तर तो या नेत्यांनाच मिळायला हवा,” असा टोला त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले, “बाळासाहेबांविषयी त्यांचं प्रेम हे बनावट आहे. २०२२ मध्ये बंड करताना त्यांनी मला सुद्धा सोबत यायला सांगितलं होतं.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरे बंधूंच्या युतीवर राजकारण तापलं; खैरे-कीर्तिकर आमनेसामने
- नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंचा संयमाचा सल्ला
- अक्षयला जॅकपॉट! ‘हाऊसफुल 5’ ने दोन दिवसांत मोडले 14 चित्रपटांचे रेकॉर्ड!













