Share

ते २५ जागाही जिंकू शकत नव्हते… मोदी, फडणवीसांना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार – संजय राऊत

Sanjay Raut claims BJP hijacked Maharashtra polls using ‘Ladki Bahin’ scheme cover.

Published On: 

Sanjay Raut criticized Narendra modi over donald trump announcement of tariffs on india.

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपने ‘हायजॅक’ केल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. “राहुल जे बोलले, तेच आम्ही पूर्वीपासून सांगतो आहोत,” असं राऊत म्हणाले.

राऊतांनी आरोप केला की, “लाडकी बहीण” योजनेच्या नावाखाली भाजपने निवडणूक हातात घेतली. त्यांनी थेट भाजपवर लोकशाही आणि निवडणूक यंत्रणेवर कब्जा केल्याचा आरोप केला. “ते तर २५ जागा जिंकू शकत नव्हते, मग एवढा एकतर्फी विजय कसा शक्य झाला?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

BJP Hijacked Maharashtra Election – Sanjay Raut

राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार जर कोणी मिळवायचा असेल, तर तो या नेत्यांनाच मिळायला हवा,” असा टोला त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले, “बाळासाहेबांविषयी त्यांचं प्रेम हे बनावट आहे. २०२२ मध्ये बंड करताना त्यांनी मला सुद्धा सोबत यायला सांगितलं होतं.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही