🕒 1 min read
दिल्ली – राजकारणातली समीकरणं कितीही बदलली तरी माणसांमधले ऋणानुबंध कायम राहतात, याची प्रचिती आज आली. बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत शोककळा पसरली. नेत्यांचे फोन खणखणत आहेत, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा पूर आलाय, पण या सगळ्या गोंधळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजली वाचून अनेकांचे डोळे पानावले आहेत.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
अजितदादांच्या कामाचा धडाका आणि स्पष्टवक्तेपणा कोणापासून लपून राहिला नव्हता. याच कामाची पोचपावती देताना अमित शाह यांनी म्हटलंय की, अजित पवार यांनी गेल्या साडेतीन दशकांत महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांनी ज्या प्रकारे काम केलं, ते शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे.
एनडीएचा आधारवड हरपला!
राज्याच्या राजकारणात अजितदादांची ‘एन्ट्री’ महायुतीमध्ये झाल्यानंतर Amit Shah आणि त्यांच्यात एक वेगळं बॉन्डिंग तयार झालं होतं. त्यामुळेच आजची घटना शाहांसाठी सुद्धा मोठा धक्का आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात स्पष्टपणे म्हटलंय की, “त्यांचे निधन हे केवळ एनडीए परिवाराचे नाही, तर माझे वैयक्तिक नुकसान आहे.”.
या अपघाताचं वृत्त समजताच अमित शाह यांनी तातडीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी संपर्क साधला. अजितदादांसारखा धडाडीचा नेता अचानक गेल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणं केवळ अशक्य आहे, अशी चर्चा आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे सत्तेचं राजकारण सुरू असतानाच काळाने असा घाला घातल्याने सर्वच जण सुन्न झाले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “आज पुन्हा पोरका झालो…” अजितदादांच्या निधनानंतर धनंजय मुंडे ढसाढसा रडले; म्हणाले, “असं वाटतंय की आता फोन येईल…”
- बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन; महाराष्ट्रावर शोककळा.
- ‘माझी अवस्था तुटलेल्या चार्जरसारखी..’, ट्विंकल खन्नाची ‘ती’ पोस्ट चांगलीच चर्चेत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












