Maharashtra Rain Alert : विदर्भात पावसाचा दीर्घकाळ खंड पडल्यामुळे शेतकरी (Farmer) आणि सामान्य नागरिक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑगस्ट (August) महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट ७० टक्क्यांहून अधिक असल्याचे अहवालांवरून दिसून येते.
ही तूट पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. तरीही, काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, कारण २ ते ५ सप्टेंबर दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert
नागपूर (Nagpur) हवामान विभागाने २ ते ५ सप्टेंबर या कालावधीसाठी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमधील काही भागांत मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यासाठी ४ सप्टेंबर रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्या दिवशी जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
नागपूर हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या मते, या ऑगस्ट महिन्यात विदर्भात पावसाची कमतरता दिसून आली आहे. पावसाअभावी अनेक भागांत कृषी संकट अधिक गडद झाले असून पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पावसातील या मोठ्या तूटिमुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे.
दरम्यान, हवामानातील बदलांमुळे ‘एल निनो’चा (El Niño) प्रभाव अधिक तीव्र होत असल्याचे वृत्त आहे. या घटनेचा पावसाच्या स्वरूपावर परिणाम होत असून, आगामी काळात ‘एल निनो’ अधिक बळावल्यास पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, विदर्भ क्षेत्रात सर्वत्र आणि सातत्याने पाऊस पडण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात ६९% आणि विदर्भात ५८% पावसाची तूट नोंदवली गेली, तर राज्याची सरासरी तूट ४६% इतकी आहे. राज्याला सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल – देवेंद्र फडणवीस
- ‘पुणेकरांनी या वादात न पडता उत्सव साजरा करा’; DJच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आवाहन
- ‘महायुतीला मराठा आरक्षण द्यायचंच नाही’; भास्कर जाधवांचा फडणवीसांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











