Share

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भरत गोगावले म्हणाले, “हे फळ भरतशेठलाच मिळणार”

भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदाबाबत सकारात्मक निर्णय होईल आणि ते पद आपल्यालाच मिळेल, असा दावा केला.

Published On: 

Bharat Gogawale hints at getting Raigad guardian minister

Bharat Gogawale : राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे: ‘महायुती’मधील (Mahayuti) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) सध्या बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेवराई शहरात आयोजित पक्षाच्या एका बैठकीत, शिवसेनेचे गेवराई तालुका प्रमुख चंद्रकांत नवले (Chandrakant Nawle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या आपल्या तक्रारी गोगावले यांच्यासमोर मांडल्या.

या भागात विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) असल्याने आपल्याला न्याय मिळत नाही, असे नवले यांनी नमूद केले. तरीही, पक्षाचा विस्तार करण्यासाठी आपण काम करत राहू आणि अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबतच राहू, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Bharat Gogawale hints at getting Raigad guardian minister

नवले यांच्या तक्रारी ऐकून घेत गोगावले यांनी त्यांना उत्तर दिले, “येथे आपला आमदार नाही याने काही फरक पडत नाही. ज्या भागात आपले प्रतिनिधित्व नाही, तेथील आव्हानांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्हाला बळ देण्यासाठीच मी येथे आलो आहे. आपल्याला संघटना वाढवण्याच्या दिशेने काम करायचे आहे.”

दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला तिढा अजूनही कायम आहे. या पदासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे.

भरत गोगावले हे पद शिवसेना (शिंदे गट) कडे यावे यासाठी उत्सुक आहेत, तर मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे या पदासाठी तितक्याच उत्सुक आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले यांनी या विषयावर एक महत्त्वपूर्ण विधान केले.

गोगावले यांनी सांगितले की, आमचे नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. त्यातून सकारात्मक निर्णय नक्कीच निघेल. “मी जवळपास पावणे दोन वर्षे वाट पाहिली आहे. “सब्र का फल मीठा होता है आणि हे फळ भरतशेठलाच मिळणार.”

पुढे गोगावले यांनी नमूद केले की, “आता तटकरे यांच्या पुतण्याने आमदारकी मिळवल्यामुळे त्यांच्यासाठी पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच 15 ऑगस्ट झेंडा देखील मीच फडकवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही