गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार का? मुंबईसह राज्याच्या (Maharashtra Weather) अनेक भागात सध्या पावसाचा लपंडाव सुरू असला, तरी पुढील पाच दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे ठरणार आहेत.
कारण, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (IMD Rain Alert) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Forecast
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दिवशी ठाणे, रायगड, रत्नागिरीसह संपूर्ण विदर्भात (अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ) यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे, २ ते ३ ऑगस्ट दरम्यान कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि चंद्रपूर-गडचिरोली पट्ट्यात मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच, ४ आणि ५ ऑगस्ट रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांचा परिसर आणि घाट रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत थेट स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असं स्पष्ट आवाहन करण्यात आलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर…..’, पंतप्रधान मोदींच्या व्हीडिओवरून किरण मानेंचा थेट हल्ला
- भाजपमध्ये अचानक मोठी उलथापालथ; आमदाराच्या राजीनाम्याने खळबळ
- एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी एक धुरंधर आले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












