Share

Tamil Nadu Politics: थलापती विजय सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना 50 कोटींची ऑफर

तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या सरकारला अल्पमतात आणण्यासाठी 15 आमदारांना राजीनाम्याच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Published On: 

CM Thalapati Vijay

🕒 1 min read

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अभिनेता ते मुख्यमंत्री बनलेले थलापती विजय (CM Thalapati Vijay) यांच्या सरकारविरोधात मोठे राजकीय षडयंत्र रचल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने एका कथित कटाचा पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. या कटानुसार, मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अवघ्या दोन महिन्यांत अल्पमतात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. या योजनेत टीव्हीकेच्या 15 आमदारांना एकत्र राजीनामा देण्यास प्रवृत्त करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. (Tamil Nadu Politics News)

आमदाराला 35 कोटींच्या ऑफरचा आरोप

या प्रकरणाचा खुलासा टीव्हीकेचे (TVK) उथयंगराई मतदारसंघातील आमदार एन. एलैयाराजा यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनंतर झाला. आमदारांच्या आरोपानुसार, एका सल्लागार कंपनीशी संबंधित व्यक्तीने विधानसभा अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर (J. C. D. Prabhakar) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी त्यांना 35 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

याशिवाय या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती बाहेर न सांगण्याची धमकीही देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांनंतर तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सेंथिल बालाजी आणि ‘करूर गँग’चे नाव चर्चेत

या कथित कट प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. तपासादरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे माजी डीएमके (DMK) मंत्री सेंथिल बालाजी (Senthil Balaji) आणि त्यांचे भाऊ अशोक यांच्याशी जोडले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. टीव्हीके आमदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये आयपीडीएस या सल्लागार कंपनीतील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आणखी दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मोठ्या नेटवर्कचा तपास सुरू

टीव्हीके सरकारचे मंत्री निर्मल कुमार यांनी या प्रकरणात ‘करूर गँग’चा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही लोक आमदारांशी संपर्क साधून 10 ते 50 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, डीएमके नेते आणि एआयएडीएमकेकडून मागच्या दाराने विजय सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे, असाही दावा करण्यात आला आहे.

DMK ने आरोप फेटाळले

दरम्यान, डीएमकेने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. डीएमके प्रवक्ते ए. सरवनन यांनी म्हटले की, टीव्हीके सरकार कोणताही ठोस पुरावा नसताना राजकीय आरोप करत आहे. जर सरकारकडे पुरावे असतील तर त्यांनी संबंधित नेत्यांवर कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही